बीड (वृत्तसंस्था) मुंबईहून बीडच्या दिशेने येणाऱ्या एका ट्रॅव्हल्सच्या बसला झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू तर २५ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. हा अपघात बीड जिल्ह्यातील आष्टा फाटा येथे झाला.
सागर ट्रॅव्हल्सची बस मुंबईकडून बीडकडे जात होती. रात्रीचा प्रवास करत ही ट्रॅव्हल बस पहाटे बीड जिल्ह्यात पोहचली होती. प्रवासी यावेळी झोपेत असतानाच अचानक सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास चालकाचा ताबा सुटल्याने बसचा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, ५ जणांचा यात मृत्यू झाला आहे. तसेच २० पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले. विशेष म्हणजे यात ९ प्रवासी गंभीर जखमी झाल्याचे समोर येत आहे. जखमी झालेल्या प्रवाशांना जामखेड व आष्टी येथील शासकीय आणि काहींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अति गंभीर जखमींना अहमदनगर येथे रवाना करण्यात आले आहेत. अपघाताची माहिती मिळताच, आमदार सुरेश धस यांनी देखील घटनास्थळी धाव घेऊन मदत केली.