पाटणा (वृत्तसंस्था) माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनावर बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम माझी यांच्या पक्षाने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. जीतनराम मांझी यांच्या हिंदुस्तानी आवाम मोर्चाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या संपूर्ण प्रकरणाची न्यायिक चौकशी करण्याची मागणी केली आहे. यामुळे बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
हिंदुस्तानी आवाम मोर्चाचे प्रवकिते डॉ. दानिश रिझवान यांनी या प्रकरणी लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. रामविलास पासवान यांच्याशी संबंधित कोणती गुपिते लपवली जात आहेत हे देशाला जाणून घ्यायचे आहे, असे दानिश रिझवान यांनी विचारले आहे. रिझवान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. रामविलास पासवान यांच्या मृत्यूसंदर्भात असे अनेक प्रश्न आहेत ज्यांद्वारे चिराग पासवान यांच्याकडे संशयाची सुई जाते, असे रिझवान यांनी म्हटले आहे. देशातील दलितांचे मोठे नेते आणि तुमच्या मंत्रिमंडळातील सरकारी रामविलास पासवान हे काही दिवसांपूर्वी आपल्याला सोडून गेले, त्यांच्या निधनाने अनेकांना धक्का बसला शोककळा पसरली. आजही त्यांच्या आठवणीने आमचं मन गहिवरून जाते. रामविलास पासवान यांच्या मृत्यूबाबत असे अनेक प्रश्न आहेत, ज्यांची उत्तरे रामविलास पासवान यांच्या नातेवाईकांबरोबरच त्यांचे समर्थकही जाणू इच्छितात असे हिंदुस्तानी आवामी मोर्चाने पासवान यांच्या मृत्यूबाबत प्रश्न उपस्थित करताना म्हटले आहे.
यामुळे या गोष्टी लक्षात घेत रामविलास पासवान यांच्या निधानाची न्यायिक चौकशी व्हायला हवी असे देखील हिंदुस्तानी आवामी मोर्चाने म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी आणि सत्य जनतेसमोर यावं अशी मागणी दानिश चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्रात केली आहे.
















