जळगाव (प्रतिनिधी) महिलांसह विद्यार्थ्यांसाठी जळगाव जिल्ह्यामध्ये आत्महत्या संदर्भात प्रबोधन समिती गठीत करण्याचे आदेश महाराष्ट्र महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना दिले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे काल दिनांक 18 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांना महिलांचा विद्यार्थ्यांसाठी जळगाव जिल्ह्यामध्ये आत्महत्या संदर्भात प्रबोधन समिती गठीत करण्याचे निवेदन देण्यात आले होते. त्या अनुषंगाने आज दुपारी एक वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर यांच्या नेतृत्वात पुन्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी बोलावून रूपाली चाकर यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना समिती गठीत करण्यासंदर्भात तातडीचे आदेश दिले.
रूपाली चाकणकर यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्यामध्ये तालुकानिहाय जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत एक समिती गठीत करणे. त्या समितीने प्रत्येक शाळा महाविद्यालयात जाऊन दर महिन्याला विद्यार्थी विद्यार्थिनींना प्रलोभन करून त्यांना एक मानसिक धीर देण्याचं काम ही प्रबोधन समिती जिल्हाभर करणार असून कदाचित या समितीमुळे शेकडो विद्यार्थी महिलांचे प्राण या ठिकाणी वाचणार आहेत. त्या प्रबोधन समितीमध्ये निवृत्त प्राध्यापक, निवृत्त न्यायाधीश, निवृत्त मानसोपचार डॉक्टर, निवृत्त आय एस, आय पी एस अधिकारी, स्वयंसेवक व स्वयंसेविका सोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आशिष उत्तमराव सपकाळे यांना समितीमध्ये घ्यावे आणि लवकरात लवकर ही समिती गठीत करावी. जेणेकरून अशा प्रकारच्या होणाऱ्या आत्महत्येला आळा घालण्याचे काम ही समिती करेल. अशा संदर्भातले पत्र रूपाली चाकणकर यांनी पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना दिले.