धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील अल्पसंख्याक समाजाच्या उमेदवाराला निवडता येऊ नये यासाठी मुद्दामहून प्रभाग रचना तयार करण्यात आल्याचा आरोप करत समाजसेवक नईम अख्तर अ.हमीद काझी यांनी प्रभाग रचनेवर हरकत घेतली आहे. प्रभाग रचना जर ब्लॉक नुसार करण्यात आली तर निश्चित कुणावरही अन्याय होणार नाही, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
समाजसेवक नईम अख्तर अ.हमीद काझी (पिलू मस्जिद मोहल्ला धरणगाव) यांनी आपल्या हरकतीत म्हटले आहे की, धरणगाव शहरातील अनेक अल्पसंख्याक समाज परिसराचे विभाजन राजकीय फायद्याचे दृष्टीने प्रभाग रचना करण्यात आलेली आहे. प्रभाग क्र. ९ मधील पिलू मस्जिद मोहल्ला हा तीन प्रभागात विभागला गेला आहे. ज्यात पिलू मस्जिद मोहल्ल्याचे वर्गीकरण प्रभाग क्र.७, व प्रभाग क्र. १० अश्या पध्दतीने हेतुपूर्वक प्रभाग विभागला गेला आहे.
अल्पसंख्याक समाजाच्या उमेदवाराला निवडता येऊ नये यासाठी मुद्दामहून प्रभाग रचना तयार करण्यात आली आहे. असे झाल्यास हा अल्पसंख्याक समाजावर अन्याय होईल व अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधी नगरपालिकेत राहणार नाही. आमचा भाग: हा गरीब वस्ती असलेला असून आमच्या भागात अनेक समस्या असतात. या समस्या दूरकरण्यासाठी अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधी नगरपरिषद मध्ये निवडून येणे गरजेचे आहे. प्रभाग रचना जर ब्लॉक नुसार करण्यात आली तर निश्चित कुणावरही अन्याय होणार नाही. अशी मागणी मी या पत्राद्वारे करीत आहे.
अल्पसंख्याक समाजाच्या जनगणनेचा विचार करून अल्पसंख्याक (मुस्लीम) समाज हिताच्या दृष्टीने योग्यतो विचार करावा, ६. प्रभाग रचनेत राजकीय हस्तक्षेप झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते. हे राजकीय हेतूने प्रेरित अशी प्रभाग रचना आहे. प्रत्येक प्रभागात रस्त्याचे, गल्ल्याचे, भागाचे विभाजन करण्यात आलेले आहे. आमच्या न्यायाच्या व हिताच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा. जेणेकरून आमच्या अल्पसंख्याक समाजावर अन्याय होणार नाही. अन्यथा न्याय मागण्यासाठी आम्हाला योग्यत्या न्यायलयात दाद मागावी लागेल, असंही हरकतीत म्हटले आहे.