जळगाव (प्रतिनिधी) सै.अहमद शहीद रह.फाउंडेशनतर्फे संचलित स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र आयोजित चर्चासत्रात आसीम खान यांनी आपले विचार व्यक्त केले. त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की यश अपयश ही स्पर्धा परीक्षेची एक अविभाज्य परिस्थिती आहे. याचा सामना आत्मविश्वासाने केला पाहिजे. स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राची पाहणी केली व समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अभ्यास केंद्राचे संचालक रागिब अहमद यांनी अभ्यास केंद्राची माहिती करून दिली. त्यानंतर आसीम खान यांच्या सत्कार अभ्यास केंद्राचे विद्यार्थी तौसीफ खाटीक, सिद्दिक पटेल, आमीन पिंजारी, अज़हर शेख, सुफियान रंगरेज यानी केला तर आभार प्रदर्शन अहमद शहीद रहमतुल्लाअलै फाउंडेशनचे सहसचिव इमरान खान यांनी केले. कार्यक्रमास प्राध्यापक शफीकुर्रहमान, अब्दुल रहीम सर, सय्यद दानिश, आमिर खान आदी उपस्थित होते.