जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्र जर भगव्या विचारांचे पाहिजे तर राष्ट्रनिर्मानासाठी युवकांनी भगव्याचे पाईक व्हावे, येणारा काळ हा संघर्षाचा असून राष्ट्र रक्षणासाठी संघटित व्हावे असे आवाहन हिंदूराष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय देसाई यांनी केले आहे. जळगाव जिल्हा केमिष्ट संघ येथे हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने युवकांना मार्गदर्शन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने धनंजय देसाई यांनी असंख्य युवकांना मार्गदर्शन केले.
दिल्ली मध्ये सुरू असलेले शेतकरी हे बाहेरून आलेले रोहिग्या असून त्यांना देशातील काही समाज कंटक पाठींबा दर्शवित असल्याचे राष्ट्राचे दुर्दैव असून यासाठी सजग राहणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन देखील यावेळी केले. तांडव नावाची मालिका ही हिंदू धर्माला बदनामी करणारी असून निर्मात्याने जरी तोडाने माफी मागितली मात्र त्याच्या मनातील विष हे तांडव मध्ये उतरवले आहे. म्हणून त्याचा विरोध करीत असल्याचे देसाई यांनी सांगितले. माझे हिंदुत्व हे जहाल नव्हे तर हे सत्य हिंदुत्व असून ते कडवट असून ते पचवण्याची ताकत आपल्या मध्ये असावी असे संबोधन देखील त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमासाठी हिंदू राष्ट्र सेना जळगाव, जयभवानी ग्रुप, स्वराज्य निर्माण सेना, बजरंग दल, स्वराज्य हिंदुस्थान आयोजक मोहन तिवारी यांनी परिश्रम घेतले.