नवी दिल्ली (वृत्तसंस्था) प्रतिकूल डेटा मोदी सरकार. .. थाळी वाजवणे, दिवे लावणे यापेक्षा अधिक गरजेचे त्यांची सुरक्षा आणि सन्मान आहे. मोदी सरकार, कोरोना योद्ध्यांचा इतका अपमान का?, असे ट्वीट करत काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे.
राज्यसभेचे खासदार बिनॉय विस्वम यांनी अश्विनी कुमार चौबे यांना यासंदर्भातील प्रश्न विचारला होता. आरोग्य सेवा कर्मचारी जसे डॉक्टर्स, परिचारिका, मदतनीस, आशा वर्कर्स यांच्यापैकी किती जणांना कोरोनाची बाधा झाली आणि किती जणांचा मृत्यू झाला, असा प्रश्न मंत्र्यांना विचारण्यात आला होता. पंतप्रधान गरीब कल्याण विमा योजनेचा लाभ घेणाऱ्या १५५ आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यामध्ये ६४ डॉक्टर्स, ३२ नर्सिंग स्टाफ, १४ आशा वर्कर्स आणि ४५ अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आरोग्य हा राज्याचा विषय आहे आणि अशाप्रकारची माहिती केंद्रीय स्तरावर आरोग्य विभाग आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे पाहिली जात नाही. जे पंतप्रधान गरीब कल्याण विमा योजनेअंतर्गत मागणी करतात त्यांची माहिती राष्ट्रीय स्तरावर ठेवली जात असल्याची माहिती, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनी कुमार चोबे यांनी दिली होती. यावरूनच काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी मोदी सरकारवर टीका केली आहे.