धरणगाव (प्रतिनिधी) पावसाळ्यामुळे नांदेडसह परिसरातील गावांमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे गटारी साफ करण्याबाबतचे निवेदन युवासेना तालुका उपाध्यक्ष भरत सैंदाणे यांनी नुकतेच दिले आहे.
धरणगाव तालुक्यातील ग्रामीण भागात गटारींमुळे घाण्याचे साम्राज्य निर्माण होऊन मच्छरांची खूप प्रमाण वाढले आहे. तरी बीडीओंनी त्वरित ग्रामपंचायतींना आदेश काढून गटारीचे साफसफाई व धुर फवारणी करून रोगराई पसरण्याआधीच उपाय योजना कराव्यात. यासाठी यासाठी युवासेना व उपतालुकाध्यक्ष भरत सैंदाणे यांना निवेदनाद्वारे विनंती केली.