TheClearNews.Com
Sunday, December 21, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआर घोटाळा : आरोपींनी ठेवीदारांसह कुणा-कुणाला पैसे दिलेत, जाणून घ्या…तपासाची १७ महत्वपूर्ण कारणे !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 18, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या १२ पैकी ९ आरोपींना न्यायालयात हजर केले होते. यावेळी संशयितांची १० दिवस पोलीस कोठडी मिळण्यासाठी पोलिसांनी काही महत्वपूर्ण कारणे न्यायालयाला सांगितली. त्यात आर्थिक अपहार व गैरव्यवहार संगनमताने व पूर्व नियोजित कटाने झाला आहे. अटक आरोपींचा गुन्हयातील यापुर्वी अटक आरोपी व पाहिजे असलेल्या आरोपींसोबत काय संबंध आहे?, अटक आरोपींनी स्वत:च्या बँक खात्यातुन ठेवीदारांव्यतिरिक्त इतर कोणास आरटीजीएस, एनईएफटी किंवा चेकव्दारे पैसे दिले आहेत काय? यासह पुरावे गोळा करण्यासाठी विविध जिल्हयात तपासकामी आरोपीसह जावून तपास करणे आवश्यक असण्यासह तब्बल १७ गंभीर कारणांचा समावेश आहे.

अटक आरोपीची पोलीस कोठडी मिळण्याची कारणे

READ ALSO

बाजार समितीत चोरी; बालाजी ट्रेडिंग कंपनीतून 1.70 लाखांची रोकड लंपास

स्टेशन परिसरात जुन्या वादातून तरुणावर गोळीबार

१) आरोपींनी बीएचआर पतसंस्थेतून कर्जाच्या नावाखाली घेतलेली रक्कम परतफेड न करता वेगवेगळया ठेवीदारांच्या ठेवी कमी किमतीत घेवून स्वत:चे पुर्ण पैसे परतफेड करण्यासाठी वापर केला आहे. सदर कटामध्ये आरोपी सोबत कोणकोण सामील आहे याचा तपास करणे आहे.

२) अटक आरोपी यांनी ठेवीदारांच्या ठेवपावत्या गोळा करण्यासाठी नेमलेले एजंट नामे अनिल पगारीया, संतोष बाफना, अशोक रूणवाल, शिरीष कुवाड, अतुल गांधी व चव्हाण यांचे व्यतिरिक्त अजून कोण होते व त्यांचा नमूद गुन्हयात सहभाग काय आहे याबाबत तपास करणे आहे. तसेच वरील एजंट यांचेकडे देखील आरोपी समक्ष चौकशी करणे आवश्यक आहे.

३) अटक आरोपींनी या गुन्हयातील इतर आरोपी नामे सुनिल देवकीनंदन झंवर, सुरज सुनिल झंवर, महावीर जैन, जितेंद्र कंडारे, सुजित वाणी, विवेक ठाकरे इ. यांचेशी संगनमत करून गुन्हा केलेला आहे. त्यामुळे प्रत्येक आरोपीची भुमिका कशी होती याबाबत तपास करणे आहे. तसेच नमूद आरोपी यांची कर्जखाती निरंक करण्यामागे संबंधितांचा काय सहभाग आहे याचा सखोल तपास करणे आहे.

४) नमूद गुन्हयातील आरोपी नामे सुनिल झंवर व सुरज झंवर यांचे कार्यालयात मिळालेल्या संगणकावरील डाटामध्ये ठेवीदार व कर्जदार यांच्या याद्या मिळून आलेल्या आहेत. त्यामुळे त्याचेशी नमूद अटक आरोपींचा काय संबंध आहे हे तपासात निष्पन्न करणे आहे.

५) नमूद गुन्हयातील यापूर्वी अटक केलेले व पाहिजे आरोपीचे ऑफीसमधून मोठया प्रमाणावर दस्तऐवज जप्त करण्यात आलेले असून त्यामध्ये काही दस्तऐवज वरील अटक आरोपी याचेशी संबंधित आहे. नमूद दस्तऐवजा बाबत आरोपीकडे तपास करणे आहे.

६) सदर आरोपी यांचे कर्ज बेकायदेशीररित्या निरंक करण्याच्या गुप्त कटामध्ये अजून कोण कोणत्या व्यक्ति होत्या याबाबत नमूद अटक आरोपीकडे तपास करणे आहे.

७) यापूर्वी अटक व पाहीजे आरोपी हे बीएचआरच्या मुख्य ऑफीसमध्ये येत होते. त्यांचेत झालेल्या मिटींगमध्ये विविध कर्जप्रकरणांची तडजोड करण्यात आली असल्याचे निष्पन्न झाले असून सदर बाबत वरील नमूद अटक आरोपीकडे तपास करणे आहे.

८) सदरचे प्रकरण अत्यंत गंभीर असून मोठया प्रमाणावर आर्थिक अपहार व गैरव्यवहार संगनमताने व पूर्व नियोजित कटाने झालेला असून आरोपींचे गैरवर्तन पाहता व संस्थेत केलेल्या बेकायदेशीर नोंदी व इतर गैरव्यवहार याबाबत वरील नमूद अटक आरोपींचा गुन्हयातील यापुर्वी अटक आरोपी व पाहिजे असलेले इतर आरोपी बरोबर काय संबंध आहे याबाबत तपास करणे आहे.

९) वरील नमूद आरोपींचे कर्ज निरंक च्या खोटया नोंदी जितेंद्र कंडारे, सुजित वाणी यांनी केल्या आहेत. याबाबत या आरोपींकडे गुन्हयातील आरोपी जितेंद्र कंडारे, सुजित वाणी यांचेशी काय संबंध आहेत, काय आर्थिक व्यवहार झाले आहेत याबाबत तपास करणे आहे. तसेच याबाबतचा गुप्त कट कोठे रचला गेला, त्यामध्ये अजुन कोणत्या व्यक्ती सामील होत्या याबाबत जाणून घ्यायचे आहे.

१०) सदर अटक आरोपींच्या बँक खात्यांची/गुंतवणुकींची व मालमत्तेची माहिती प्राप्त करणे असल्याने त्याबाबत त्यांचेकडे तपास करणे आहे.

११) ठेवीदारांनी त्यांची पावती २० ते ४० टक्के किमतीमध्ये देण्याची परिस्थिती सदर अटक आरोपींनी निर्माण केली व ठेवीदारांकडून कोन्या स्टॅम्पपेपरवर सह्या घेवून त्यांची रक्कम तथाकथित कर्जदार यांच्या खात्यात संपूर्ण व्याजासहीत वर्ग करावी असा खोटया आशयाचा मजकूर प्रतिज्ञापत्रावर लिहण्यात / टाईप करण्यात आला. याबाबत आरोपीकडे तपास करणे आहे. तसेच स्टॅम्पपेपर कोठून खरेदी केले, त्याच्या नोटरी कोठे केल्या, त्यांच्या मिटींग कोठे होत होत्या याबाबत त्यांचेकडे तपास करणे आहे.

१२) अटक आरोपींनी काही ठेवीदारांना रोख रक्कम दिली आहे तसेच कर्ज निरंक करताना रोखीने व्यवहार केल्याबावत यापुर्वी जप्त केलेल्या कागदपत्रामध्ये पुरावे मिळून आलेले आहेत. सदरची रोख रक्कम त्यांनी कोठून आणली याबाबत त्यांचेकडे समक्ष तपास करणे आहे.

१३) गुन्हयामध्ये मोठया प्रमाणावर खोटा दस्तऐवजी पुरावा असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदरचा दस्त ऐवजी पुरावा कोठे बनविण्यात आला. याबाबत तपास करणे आहे. तसेच नमूद अटक आरोपींचे हस्ताक्षर नमुने घेवून हस्ताक्षर तज्ञांकडे पाठवून अभिप्राय प्राप्त करणे आहे.

१४) आरोपी हे जळगाव, मुंबई व औरंगाबाद येथील रहिवासी असुन त्यांनी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील ठेवीदारांच्या ठेवी वर्ग करुन घेतल्या आहेत त्यामुळे पुरावे गोळा करण्यासाठी विविध जिल्हयात तपासकामी आरोपीसह जावून तपास करणे आवश्यक आहे.

१५) वरील नमूद अटक कर्जदार आरोपी यांना त्यांचे गैरकारभारासाठी ठेवीदार यांची माहिती पुरविणाऱ्या इसमांबाबत त्यांचेकडे तपास करून अशी माहिती पुरविणाऱ्या इसमांकडे तपास करणे आहे.

१६) सदर गुन्हयात पाहिजे आरोपी अवसायक जितेंद्र कंडारे, सुनिल झंवर व अठक आरोपी महावीर जैन, सुजित वाणी यांनी वर नमूद अटक आरोपी पैकी कोणाकोणाची कर्ज प्रकरणे निरंक केली आहेत. याबाबत उपलब्ध कागदपत्रावरून नमूद अटक आरोपींकडे चौकशी करून तपास करणे आहे.

१७) वरील नमूद अटक आरोपी यांनी स्वत:चे बँक खात्यातुन ठेवीदारांव्यतिरिक्त इतर कोणास आरटीजीएस, एनईएफटी चेक याव्दारे पैसे दिले आहेत काय? त्या संबंधीत लोकांकडे तपास करून त्यांचा गुन्हयात कितपत सहभाग आहे याबाबत तपास करणे आहे.

१८) वरील अटक आरोपी यांचे इतर कोणी सहकारी आहेत का? याबाबत आरोपींकडे तपास करून त्यांचाही शोध घेवून अठक करणे आहे. तरी वरील नमुद कारणांकरीता अटक आरोपींची १० दिवस पोलीस कस्टडी मिळणेस विनंती आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

बाजार समितीत चोरी; बालाजी ट्रेडिंग कंपनीतून 1.70 लाखांची रोकड लंपास

December 21, 2025
गुन्हे

स्टेशन परिसरात जुन्या वादातून तरुणावर गोळीबार

December 20, 2025
गुन्हे

जुन्या वादाची खुन्नस ठेवून फायनान्स कर्मचाऱ्याचा गळा आवळून खून

December 20, 2025
जळगाव

अनुभूतीच्या एड्युफेअर मध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी – प्रेम कोगटा

December 19, 2025
मुक्ताईनगर

पाडळसरे धरणाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्याची मागणी; आ. एकनाथराव खडसेंचा विधानपरिषदेत पाठपुरावा

December 19, 2025
गुन्हे

नेपाळ येथे देवदर्शनासाठी गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

December 19, 2025
Next Post

धरणगाव येथे राजकीय ओबीसी आरक्षण अबाधित राखण्यासाठी तहसीलदारांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पंकज कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वाचन संकल्प विकास कार्यशाळा व सामूहिक वाचन उपक्रम संपन्न

January 1, 2025

बाल विवाह रोखण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

May 11, 2021

‘ग. स. सोसायटी’च्या स्वीकृत संचालकपदी महापौर जयश्री महाजन यांची निवड

May 29, 2022

धरणगावची पाणी समस्या आता पंतप्रधान, राष्ट्रपतींसह मुख्यमंत्री आणि राज्यपालांपर्यंत पोहचणार !

July 28, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group