धरणगाव (प्रतिनिधी) टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्यच्या धरणगाव तालुका कार्यकर्त्यांनी धरणगाव शहरातील गरजू व्यक्तींना अन्नदान कार्यक्रम हाती घेत फूड पैकेट व पाण्याच्या बॉटल वाटप करण्यात आल्यात.
धरणगाव तालुक्यातील पिंपळे येथील रहिवासी नारायण लाला पाटील हे नुकतेच कोरोना महामारीच्या आजारातून बरे होवून घरी आल्याचा आनंद साजरा करीत त्यांचे चिरंजीव आकाश पाटील यांच्यावतीने गरजूंना अन्नदान तर सावखेडा येथील विशाल कदम यांच्यावतीने पाण्याच्या बॉटल वाटप करण्यात आल्यात.
टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष पैलवान तानाजी भाऊ जाधव, उत्तर महाराष्ट्राचे सागर भाऊ कांबळे, खान्देश विभाग अध्यक्ष हृषीकेश बाबा भांडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जळगाव जिल्हा सदस्य गौरव उमप, जितु निंबाळकर, मनोज बाविस्कर, अंकुश मराठे यांच्या हस्ते आन्नादानाची सुरुवात करण्यात आली. तसेच कोरोना महामारीच्या काळात अविरतपणे सेवा देणारे व कर्तव्यावर असलेले पोलिस जवान, नगरपालिकेचे कर्मचारी यांना देखील पाण्याच्या बॉटल देण्यात आल्यात.
प्रसंगी नरेंद्र कायस्त, विनायक नेटारे, शिव महाजन, बजरंग दलचे प्रथम सूर्यवंशी, बजरंग ग्रुप चे अमोल राजपुत, भूषण महाजन, सागर पाटील, कल्पेश पवार, कृष्णा सुतार, अक्षय राजपुत, अमोल राजपुत, राहुल भोई, नितीन जाधव, रितेश फुलझाडे, इंद्रसिंग राजपुत, चेतन पाटील आदी टायगर ग्रुपचे सदस्य उपस्थित होते. यावेळी गरजूंनी टायगर ग्रुप चे आभार व्यक्त केले.