
जळगाव, (शहाबाज देशपांडे) : जिल्हाधिकारी यांनी शुक्रवारी हतनूर धरणास भेट देऊन धरणातील पाणीपातळी, उपलब्ध जलसाठा तसेच धरणाच्या सुरक्षेशी संबंधित विविध तांत्रिक बाबींची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून धरणाची सद्यस्थिती, जलसाठ्याचे व्यवस्थापन, सुरक्षेच्या उपाययोजना तसेच संभाव्य परिस्थितीचा सविस्तर आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला.
पावसाची सद्यस्थिती लक्षात घेता कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तत्काळ प्रतिसाद देता यावा, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी पूर्णपणे सज्ज राहून परस्पर समन्वयाने काम करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. तसेच आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना वेळेत राबवून नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
















