धरणगाव (प्रतिनिधी) कोविडचा वाढता संसर्ग पाहता प्रशासनाने धरणगाव शहरात २३ मार्चपासून ते २७ मार्चपर्यंत असा पाच दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर केला आहे.
आज नोडल अधिकारी तथा विभागीय अधिकारी विनय गोसावी यांचा अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शहरात मंगळवार दि. २३ मार्च २०२१ ते शनिवार २७ मार्च २०२१ असे एकूण ५ दिवस लॉकडाऊन ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. यामध्ये फक्त मेडिकल व दुध यांना सुट देण्यात आली आहे. सर्व बैठकीला सर्व अधिकारी, राजकीय पदाधिकारी, पत्रकार, नगराध्यक्ष नगरसेवक, लहान मोठे सर्व व्यापारी, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. सर्वानी या शासकीय व जनता कर्फ्यूला सहकार्य करावे, असे आव्हान एरंडोल विभागीय अधिकारी तथा नोडल अधिकारी विनय गोसावी यांनी केले आहे