धरणगाव (प्रतिनिधी) कोणत्याही गावाच्या विकासाला सर्वांची साथ हवी व एकजुटीसह श्रध्देची जोड हवी, असे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते पष्टाणे येथील विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.
राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज पष्टाने येथील १४ वा युक्त आयोग व दलित वस्ती योजना अंतर्गत कॉंक्रीटी करणे व पेव्हर ब्लॉक बसवणे या कामाचा उदघाटन शुभारंभ प्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, या पुढील काम आपण लवकरचं मार्गी लावणार आहोत. परंतू यासाठी गावकर्यांची एकजुट हवी. गावाच्या विकासात राजकारण आणता कामा नये. सर्वांनी एकोप्याने मिळून काम केल्यास गावाचा खर्या अर्थाने विकास होत असतो,असेही ना. पाटील म्हणाले. धरणगाव ते सोनवद व आजूबाजूचा परिसरातील सर्व कामे पूर्ण केल्याबद्दल व शेत रस्त्यांच्या कामांना सुरुवात केल्याबद्दल पष्टाणे ग्रामपंचायत, विकास सोसायटी, शेतकरी व ग्रामस्थांमार्फत पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचा यावेळी भव्य सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रम प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, प्रेमराज बापू, तालुका प्रमुख गजानन पाटील व डी.ओ.पाटील, शिवसेना शाखा प्रमुख व ग्रा.पं सदस्य संजय ठाकरे,सरपंच प्रकाश सोनवणे ग्रा.पं सदस्य अरविंद जाधव, सुनील पाटील, शरद जाधव, हिरामण नाईक व ग्रामसेवक देवरे आप्पा, रविंद्र ठाकरे, शुभम ठाकरे, ललित ठाकरे, जयेश ठाकरे, गौरव पाटील, विशाल ठाकरे, मच्छिंद्र मराठे तसेच ग्रामपंचायतील सर्व सदस्य व पदाधिकारी, परिसरातील सोसायटी चेअरमन सदस्य यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.