धरणगाव (वृत्तसंस्था) येथील तालुक्यात ८९ गावांचा समावेश असून ४२ हजार हेक्टर क्षेत्र क्षेत्रफळ असून त्यासाठी केवळ ४ कृषी सहाय्यक असल्याने शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या विविध कृषी विषयक योजना पोहोचत नसल्याचा आरोप होत आहे. तसेच वेळेवर काम न करता शेतकऱ्यांची फिरवा-फिरव होत आहे.
धरणगाव तालुक्याची निर्मिती होऊन १८ वर्ष झालीत त्यावेळी ८९ गावांचा समावेश धरणगाव तालुक्यात करण्यात आला तर उर्वरित ६२ गावे एरंडोल तालुक्यात जोडली गेली आहेत. याठिकाणी धरणगाव तालुक्यात कृषी मंडळ अधिकारी हे पद सुद्धा देखील रिक्त आहे परंतु या ठिकाणी चार महिन्यापासून हे पद रिक्त झालेले दिसून येत आहे शेतकऱ्यांचे हाल होतांना दिसून येत आहे कामे सुद्धा रखडलेली आहेत हे कार्यालय या ठिकाणी आहे कॉलनी परिसरात त्या ठिकाणी हे भाडे तत्वावर सुरु आहे त्याचे देखील साधारणपणे पाच ते सहा हजार रुपये भाडे सुरू असून शासनाला भरावे लागत आहे.
शासनाच्या नियमानुसार प्रत्येक कृषी सहाय्यकास दीड हजार हेक्टर क्षेत्र क्षेत्रावर काम करावयाचे असते त्यासाठी अपेक्षित तालुक्यात २४ कृषी सहाय्यक असणे गरजेचे आहे परंतु मंजूर पदे केवळ १२ असून सध्या स्थितीत भरलेली पदे कृषि सहायकाचे ३ आहेत. तालुक्याचा विचार केला असता तर सध्या प्रति कृषी सहाय्यक आला २२ गावे येतात आणि २५०० हेक्टर क्षेत्र एका कृषी सहाय्यकाकडे आहे. सध्या कर्मचाऱ्यांची संख्या पाहिली असता ही फार कमी दिसून येथे कमी कर्मचारी असल्याकारणाने शेतकऱ्यांना कृषी विषयक सल्ला देणे, पीक स्थितीचे पाहणी करणे, शेतीशाळा, पंचनामे, मृदुसंधारण, फलोत्पादन योजना, कृषी सांख्यिकी अशी अनेक कामे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अडचणी येतात मात्र अत्ता काल वाऱ्या वादळी पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र अजून पंचनामे नाहीत.
शेतकऱ्यांना गाव पातळीवर कृषी योजनांची माहिती व नवीन तंत्रज्ञानाची ओळख तसेच इतर विस्तार कार्य करण्यात कृषी सहायकांची खूप दमछाक होते. शेतकऱ्यानं पर्यंत ग्रामीण भागात काही योजना पोहचत नाही तसेच त्यांना अनुदानासाठी हेल पाट्या कृषी अधिकारी कार्यालय या ठिकाणी मागे लागत असतात व शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळू शकत नाही. अशा पद्धतीने काही योजना धरणगाव तालुक्यात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत व कार्यालय रामभरोसे सुरू आहे याकडे प्रशासन लक्ष देणार का असा देखील प्रश्न शेतकऱ्यांकडून वारंवार पद्धतीने विचारला जात असतो. जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचा धरणगाव तालुका हा बालेकिल्ला समजला जातो एकीकडे कृषी कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याकारणाने तालुक्यात शोकांतिका व्यक्त करण्यात येत आहे शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचत नसल्याने या संदर्भात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी लक्ष घालावे अशी ही मागणी शेतकरी वर्गाकडून होतांना दिसून येते.