जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा बँकेच्या अडचणीच्या सहा कलमी सूचीवर तोडगा काढण्यासाठी दि.२७ रोजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत नाशिकला बैठक होणार आहे. नाशिकच्या शासकीय विश्रामगृहात होणाऱ्या बैठकीला बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांच्यासह बँकेचे संचालक व कार्यकारी संचालक उपस्थित राहणार आहेत. बँकेच्या अडचणीबाबत सहकार मंत्र्यांसोबत इतिहासात प्रथमच अशी बैठक होत या असल्याचे अध्यक्ष संजय पवार यांनी पत्रकारांना सांगितले.
पवार पवार म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र देऊन तसेच भेट घेउन तु जिल्हा बँकेच्या अडचणींची माहिती दिली होती. संजय पवार यांच्याशी चर्चेनंतर तातडीने सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत नाशिकला बैठकीचे नियोजन ठरले. सहा मुद्यावर चर्चा बँकेच्या अडचणीची सहा कलमी सूचीप्रमाणे जिल्ह्यातील तीन साखर कारखान्याची थकहमीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. त्यात, रावेर साखर कारखान्याची २७ कोटी तीन लाख, बेलगंगा कारखाना (चाळीसगाव) ७ कोटी ४६ लाख, मुक्ताई कारखान्याची ९ कोटी २७ याप्रमाणे ४७ कोटी ७७ लाखाच्या थकहमीची मागणी केली आहे.
राज्यातील धाराशीव, नांदेड, सोलापूर जिल्हा बँकांना शासनाने कारखान्याच्या थकहमीच्या रकमा दिल्या. त्यानुसारच ही मागणी करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या ७०० कोटीच्या ठेवी शासनाने राष्ट्रीयकृत बँकेकडे ठेवण्यास मंजुरी दिली आहे. त्या ठेवी जिल्हा बँकेकडे ठेवाव्यात. प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांचे पगार जिल्हा बँकेतच जमा ठेवावा. बँकेतर्फे शेतकऱ्यांना शून्य टक्के दराने कर्ज देण्यात येत होते, मात्र केंद्र सरकारने फसल ग्रीन योजनेतर्गत माहिती भरायला सांगितली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराने कर्जाचा लाभ मिळत नाही, त्यामुळे यावरही शासनाकडून निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे. उपसासिंचन योजनेसाठी भरलेले २५ कोटी ६० लाख रुपये व्याजासह परत मिळावेत, जिल्ह्यातील प्राथमिक विविध कार्यकारी संस्थाकडे असलेली अनिष्ट तफावतीची रक्कम रुपये ६०० कोटी तातडीने कमी करण्याची मागणी आहे. संचालकांना पत्र जिल्हा बँकेच्या अडचणीबाबत नाशिक येथे होणाऱ्या या बैठकीचे सर्व संचालकांना पत्र देउन सहा कलमी सूचीवर मनोगत व्यक्त करण्यास कळविण्यात आले आहे.