नागपूर (वृत्तसंस्था) लग्नाच्या वऱ्हाडाचा अपघात होऊन सहा जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नागपूर येथील काटोल मार्गावरील सोनखाब ताराबोळी शिवारात घडली. कॉलिस आणि ट्रकच्या झालेल्या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला. तर, एकजण गंभीर जखमी झाला आहे. रमेश हेलोंडे, सुधाकर मानकर, विठ्ठल धोटे, अजय चिखले, वैभव चिखले, मयुर इंगळे अशी मृत्यू झालेल्यांची नावं आहेत. तर जगदीश ढोणे, असे गंभीर जखमीचे नाव आहे.
क्वालीस गाडी नागपूरवरून काटोलच्या दिशेनं जात असताना ट्रकनं गाडीला जोरदार धडक दिली. नागपुरात एका लग्नाचा कार्यक्रम आटपून हे सर्वजण काटोलच्या दिशेनं जात होते त्यावेळी भीषण अपघात झाला. जखमीला नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. एका क्वॉलीस कारमधून सात जण नागपूरहून काटोलच्या दिशेनं प्रवास करत होते. नागपुरात एका लग्नाही हे सातही जण उपस्थित राहण्यासाठी आले होते. रात्री उशीरा नागपुरातील लग्नाचा कार्यक्रम आटपून सातहीजण आपल्या घरी निघाले होते. पण रस्त्यातच त्यांचा अपघाती मृत्यू झाला.
अपघातातील मृतांची नावे :
वैभव साहेबराव चिखले (वय 32)
सुधाकर रामचंद्र मानकर (वय 42)
रमेश ओंकार हेलोंडे (वय 48)
मयूर मोरेश्वर इंगळे (वय 26)
अजय दशरथ चिखले (वय 45)
विठ्ठल दिगंबर थोटे (वय 45)