TheClearNews.Com
Friday, May 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

“व्यसनमुक्तीसाठी ऑपरेशन सिंदूर राबविण्याची आवश्यकता” – डॉ.नितीन विसपुते

जैन इरिगेशनमध्ये 'जागतिक तंबाखू विरोधी दिना'निमित्त व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन

vijay waghmare by vijay waghmare
June 1, 2025
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) “भारतात दरवर्षी दहा लाख लोक व्यसनांमुळे मृत्युमुखी पडतात, त्यामुळे तितक्याच महिलांच्या कपाळाचे कुंकू पुसले जाते; खरं तर ऑपरेशन सिंदूर हे व्यसनमुक्तीसाठी अवलंबण्याची गरज आहे…” असे प्रतिपादन चेतना व्यसनमुक्तीचे संचालक डॉ. नितीन विसपुते यांनी केले.
व्यसनमुक्तीनेच जीवन समृद्धीच्या दिशेने वाटचाल होऊ शकते असे ही ते म्हणाले. जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त जैन इरिगेशन प्लास्टिक पार्क, बांभोरी आणि जैन फूड पार्क येथे सहकाऱ्यांसाठी विशेष जागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
व्यसनमुक्त जीवनशैलीचे महत्त्व पटवून देत डॉ .विसपुते यांनी प्रभावी मार्गदर्शन केले. सकाळी जैन प्लास्टिक पार्कला आयोजित कार्यक्रमात त्यांनी कंपनीच्या सहकाऱ्यांशी सुसंवाद साधला. त्यात ते म्हणाले की,
“देवाने माणसाचे जीवन सोपे केले, पण माणसानेच ते व्यसनांच्या आहारी जाऊन कठीण, गुंतागुंतीचे बनवले आहे,” असे सांगत, व्यसनामुळे होणाऱ्या नुकसानांचे स्पष्ट चित्र उपस्थितांपुढे मांडले. व्यसनामुळे तोंड व शरीरास दुर्गंध येतो, प्रतिकारशक्ती घटते, आनंददायक संप्रेरकांची निर्मिती कमी होते आणि व्यक्तीची सामाजिक प्रतिष्ठा ढासळते, असे त्यांनी नमूद केले.
व्यसनमुक्त होण्यासाठी त्यांनी निसर्गाच्या सान्निध्यात राहणे, ध्यानधारणा करणे, कुटुंबीयांशी संवाद वाढवणे आणि सजगता विकसित करणे हे उपाय सुचवले.

विसपुते यांनी गौतम बुद्धांचा अंतिम संदेश “मोह, माया सोडा आणि सजग रहा” याची आठवण करून दिली. १९१७ मध्ये राम गणेश गडकरी यांनी लिहिलेल्या ‘एकच प्याला’ या नाटकाचा संदर्भ देत असेही नमूद केले की, व्यसनाधीनतेची स्थिती १०८ वर्षा नंतर आजही बदललेली नाही, ही खेदजनक बाब बोलून दाखविली.

READ ALSO

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल

महात्मा गांधी हे लाईटहाऊस आहेत- कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे

कार्यक्रमाच्या प्रारंभी कंपनीचे वरिष्ठ सहकारी सी.एस. नाईक यांनी प्रस्तावना केली. ‘आपला एकही सहकारी व्यसनी नसावा हा विचार कंपनीचे संस्थापक श्रद्धेय (मोठेभाऊ) भवरलालजी जैन यांनी कंपनीच्या स्थापनेपासूनच करून त्यावर प्रत्यक्ष कृती केली. आज त्यांच्यानंतर पुढच्या पिढीने देखील त्यात सातत्य ठेवले आहे. आजच्या दिवसाच्या निमित्ताने प्रत्येकाने व्यसने सोडण्याचा संकल्प घेतला पाहिजे…’ असे आवाहन देखील त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर बोरसे यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. ज्ञानेश पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी झालेल्या प्रश्नोत्तर सत्रात सहकाऱ्यांनी सहभाग घेतला.

जैन फूड पार्क येथे डॉ. विसपुते यांनी सहकाऱ्यांशी साधला संवाद

जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर जैन फुड पार्क येथील कांदा निर्जलीकरण प्रकल्पातच्या ट्रेनिंग हॉल येथे सहकाऱ्यांसाठी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय पारख तर प्रमुख पाहुणे म्हणून असलम देशपांडे, डॉ. अरुण चौधरी होते.

सुसंवाद साधताना डॉ. विसपुते म्हणाले की, व्यसनी व्यक्तीमुळे कुटुंबातील पत्नी आणि लहान मुलांचेही आरोग्य धोक्यात येते, हे त्यांनी अधोरेखित केले. व्यसन केवळ वैयक्तिक नाही तर संपूर्ण कुटुंबाच्या आयुष्यावर परिणाम करत असल्यामुळे त्यातून बाहेर पडणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात त्यांनी दोन महत्त्वाचे कानमंत्रही दिले, यात ‘१३८ फॉर्म्युला’ म्हणजे एक तास व्यायाम, तीन वेळा जेवण, आणि आठ तासांची शांत झोप. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी सांगितली की, मानवाला संगीत, सुगंध आणि ध्यानधारणा करणे आवडते. चांगल्या जीवनासाठी या तीन गोष्टींमध्ये आपले मन गुंतवावे असा मोलाचा सल्लाही बोलताना दिला गेला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय पारख यांनी केले तर वक्ते डॉ. विसपुते यांचा परिचय, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कंपनीच्या गृहपत्रिकेच्या संपादकीय मंडळाचे सदस्य किशोर कुलकर्णी यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल

May 1, 2026
जळगाव

महात्मा गांधी हे लाईटहाऊस आहेत- कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे

May 1, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 मे 2026 !

May 1, 2026
गुन्हे

बुधवार ठरला अपघातवार, तीन अपघात पाचजण ठार, २६ जखमी

April 30, 2026
गुन्हे

बंद घरातून साडेनऊ लाखांचा मुद्देमाल लंपास

April 30, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 एप्रिल 2026 !

April 30, 2026
Next Post

भुसावळातील ‘ब्रेकींग महाराष्ट्र’चा ‘वाटा शिक्षणाचा’ उप्रकम विद्यार्थ्यांसाठी पथदर्शी : महेश फालक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

५० लाख द्या, नाहीतर उमेदवारी कापू !

October 26, 2024

पाचोर्यात स्व. राजीव गांधी यांना भरपावसात आदरांजली

August 22, 2021

कृषी योजनांच्या माहितीसाठी आता व्हाटस्ॲप आणि ब्लॉगचा वापर : कृषीमंत्री दादाजी भुसे

November 13, 2020

राष्ट्रवादीचा भाजपला झटका, कल्याण काळे घड्याळ बांधणार?

December 19, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group