TheClearNews.Com
Sunday, August 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत गंभीर चूक ; फिरोजपूर सभा रद्द !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 5, 2022
in राजकीय, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

चंदीगड (वृत्तसंस्था) आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पंजाब भागात (Prime Minister Modi’s Punjab rally) रॅली घेणार होते. पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पंतप्रधान ज्या मार्गावरून जाणार होते, त्याच मार्गावर आंदोलकांचा मोठा जमाव होता. त्यामुळे पंतप्रधानांना जवळपास १५ ते २० मिनिटे एकाच ठिकाणी थांबावे लागले.

यानंतर अनेकांकडून टीका केली जात आहे. पंजाब सरकारला आधीच मोदींच्या कार्यक्रमाची माहिती होती. त्यामुळे त्यांनी प्लान बी तयार ठेवणं अपेक्षित होतं, असं सांगितलं जात आहे. याशिवाय रस्ते मार्गावर पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली नव्हती. ही गंभीर चूक असल्याचं मानलं जात आहे. या प्रकरणात गृह मंत्रालयाने नाराजी व्यक्त केली असून पंजाब सरकारकडून सविस्तर रिपोर्ट मागवण्यात आला आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी पंजाबमधील हसैनीवाला येथून दिल्लीसाठी रवाना झाले. फिरोजपूर व्यतिरिक्त ९ जानेवारी रोजी पंतप्रधान मोदींची उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे रॅली होणार होती. ही रॅलीदेखील रद्द करण्यात आली आहे. अशी माहिती सांगितली जात आहे.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

केंद्रीय गृह मंत्रालयाचं वक्तव्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षेचा भंग करण्यात आला. आज सकाळी पंतप्रधान भटिंडा येथे उतरले तेथून ते हेलिकॉप्टरने हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकावर जाणार होते. पाऊस आणि खराब दृश्यमानतेमुळे, पंतप्रधानांनी हवामान स्वच्छ होण्याची सुमारे २० मिनिटे वाट पाहिली. जेव्हा हवामान सुधारले नाही, तेव्हा असे ठरले की तो रस्त्याने राष्ट्रीय मेरीटर्स मेमोरियलला भेट देईल, ज्यासाठी २ तासांपेक्षा जास्त वेळ लागेल. डीजीपी पंजाब पोलिसांकडून आवश्यक सुरक्षा व्यवस्थेची पुष्टी केल्यानंतर पंतप्रधान रस्त्याने प्रवास करण्यास निघाले.

हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकापासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर, जेव्हा पंतप्रधानांचा ताफा उड्डाणपुलावर पोहोचला तेव्हा काही आंदोलकांनी रस्ता अडवला असल्याचे दिसून आले. पंतप्रधान १५-२० मिनिटे फ्लायओव्हरवर अडकले होते. पंतप्रधानांच्या सुरक्षेतील ही मोठी चूक होती. पंतप्रधानांचे वेळापत्रक आणि प्रवासाची योजना पंजाब सरकारला आधीच कळवण्यात आली होती. प्रक्रियेनुसार, त्यांना रसद, सुरक्षेसाठी आवश्यक व्यवस्था करावी लागेल तसेच आकस्मिक योजना तयार ठेवावी लागेल. तसेच आकस्मिक योजना लक्षात घेता पंजाब सरकारला रस्त्याने कोणतीही हालचाल सुरक्षित ठेवण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा तैनात करावी लागेल, जी स्पष्टपणे तैनात केलेली नव्हती. या सुरक्षेतील त्रुटींनंतर पुन्हा भटिंडा विमानतळाकडे जाण्याचा निर्णय घेण्यात आला. या गंभीर सुरक्षेतील त्रुटींची दखल घेत गृह मंत्रालयाने राज्य सरकारकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. राज्य सरकारलाही या चुकांची जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे.

चन्नी यांनी आरोप फेटाळला

पंतप्रधानांच्या दौऱ्याला काही शेतकरी संघटनांचा विरोध होता. हुसैनीवालाकडे जाणाऱ्या मार्गावर आज शेतकऱ्यांकडून निदर्शने करण्यात आली. शेतकऱ्यांनी रस्ता रोखून धरला. त्यातच पंतप्रधानांचा ताफा अडकला अशी माहिती मिळत आहे. शेतकऱ्यांनी रस्ता रोखल्याचे माहीत असून पंजाब पोलिसांनी त्याबाबत एसपीजीला कल्पना दिली नाही. त्यामुळेच पंतप्रधानांना माघारी फिरावे लागले, अशी बाबही आता समोर येत असून त्यावरून मोठं वादळ उठलं आहे. याप्रकरणी भाजपने पंजाब सरकारला फटकारले असून पंतप्रधानांना पुरेशी सुरक्षा पुरवू न शकणाऱ्या मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीच भाजप प्रदेशाध्यक्ष अश्विनी शर्मा यांनी केली आहे. मात्र चन्नी यांनी आरोप फेटाळले आहेत. पंतप्रधान हवाईमार्गे येणार होते. मात्र आम्हाला कोणतीही कल्पना न देता त्यात बदल करण्यात आला. त्यामुळे ही सुरक्षेतील चूक म्हणता येणार नाही, असे चन्नी म्हणाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #PrimeMinisterModi'sPunjabrally

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
Next Post

Corona : राज्यातील महाविद्यालयं १५ फ्रेब्रुवारीपर्यंत बंद ; उच्चशिक्षण मंत्र्यांचा मोठा निर्णय !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अखिलेश यादवांचा भाजपला हादरा ; ज्येष्ठ मंत्री मौर्य यांच्यासह ८ आमदार समाजवादी पक्षात

January 12, 2022

एसएसआर नेव्हीमध्ये निवड झाल्याने अक्षय शिंपी याचा कासोदा येथे सत्कार

February 7, 2022

तायक्वांदो स्पर्धेत सेन्सर प्रणालीचा वापर प्रभावी ठरला : जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक !

December 20, 2023

‘निवडणुकांपूर्वी दंगली घडविण्याचा कट भाजपने आखलाय’ ; संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप !

April 19, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group