
जळगाव (प्रतिनिधी) शिवाजी नगरच्या रहिवाशांना तहसील कार्यालयाकडून रुळ ओलांडून जाण्यास रेल्वे प्रशासनाची परवानगी दिली असून आपण आंदोलन करू नये, अशी विनंती रेल्वे प्रशासनाने मनसे जिल्हा सचिव अॅड. जमील देशपांडे यांच्या सोबत प्रत्यक्ष चर्चा करतांना केली.
रेल्वे प्रशासनाने केली मनसे सोबत शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास चर्चा केली. रेल्वे प्रशासनाने मनसे जिल्हा सचिव अॅड. जमील देशपांडे यांच्यासोबत प्रत्यक्ष चर्चा केली. तसेच मनसेने आंदोलन करू नये,अशी विनंती केली. तसेच तहसील कार्यालया समोरील रेल्वे रूळ ओलांडून शिवाजी नगर परिसरातील नागरिक जाऊ शकतो त्यांना कोणी अटकाव करणार नाही, असे आश्वासन दिले. एवढेच नव्हे तर येणाऱ्या-जाणाऱ्या रेल्वे गाड्यांची गती कमी करण्यात आली असल्याचे प्रत्यक्ष दाखवून दिले. तर नागरिकांनी फक्त तेथूनच रूळ ओलांडून जावे. अन्य ठिकाणी रूळ ओलांडू नये, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या ठिकाणाहून लोटगाडी, मोटरसायकल घेऊन जाऊ नये व स्वतःची काळजी घ्यावी, असेही सांगितले. दरम्यान, लवकरच रेल्वेचा जिना वापरण्याबाबत पण निर्णय होईल. या करिता वरिष्ठ स्तरावर पत्रव्यवहार करण्यात आला आहे, असेही रेल्वे प्रशासनाने मनसेला सांगितले.

















