चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील विरवाडे येथील तिघांचा आज दुपारी गूळ नदीचा प्रवाह बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृतांमध्ये दोन सख्खे भाऊ व एक चुलत भावाचा समावेश आहे.
याबाबत आधिक माहिती अशी की, कुणाल भरत पाटील, सुमित भरत पाटील हे दोघे भाऊ व त्याचा चुलत भाऊ असे मृतकांचे नावे आहेत. आज दुपारी दीड वाजता घटना उघडकीस आली आहे. कुणाल पाटील हा एमएससीचे शिक्षण घेत होता, तर सुमित हा नाशिक येथे इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला होता. तसेच, चुलत भाऊ ऋषिकेश पाटील हा बीएसी करून विरवाडे गावात फोटोग्राफीचा व्यवसाय करत होता. तिघे जण शेतकरी कुटुंबातील होते आणि विशेष म्हणजे ऋषिकेश हा एकुलता एक होता तर कुणाल व सुमित देखील दोनच भाऊ होते. तिघेही अविवाहित असल्याने त्याच्या पश्चात फक्त आई वडील आहेत.