अमळनेर (प्रतिनिधी) – शिवीगाळ केल्याच्या कारणावरून दोन गटात लाठ्या काठ्यांनी हाणामारी झाल्याची घटना तालुक्यातील सबगव्हाण येथे २३ रोजी सायंकाळी ६ वाजता घडली. या प्रकरणी दोन्ही गटाच्या ६ जणांविरुद्ध मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रवींद्र शांताराम पाटील यांनी – यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, रोहित मनोहर पाटील, मनोहर रोहिदास पाटील, – ललिता मनोहर पाटील या तिघांनी शिवीगाळ केल्यावरून त्यांची पत्नी, – मुलगा व त्यांना शिवीगाळ आणि चापट – बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच ते पत्नीला सोडवायला गेले होते, तेव्हा मनोहर – याने काठीने त्याच्या डोक्यावर मारून इजा केली. तर मुलगा नीलेश व सागर – हे सोडवायला आले असता रोहित आणि मनोहर या दोघांनी काठ्यांनी मारहाण केली. याबाबत मारवड पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हे. कॉ. संजय सूर्यवंशी करत आहेत. तर दुसऱ्या गटातर्फे मनोहर रोहिदास पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २३ रोजी सायंकाळी ६.३० वाजता ते आपल्या आई व पत्नीसोबत घराबाहेर बसलेले होते. या वेळी रवींद्र शांताराम पाटील, नीलेश रवींद्र पाटील, सागर रवींद्र पाटील यांनी शिवीगाळ करून चापटा बुक्यांनी मारहाण केली. तसेच तू आमच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात का गेला, असे म्हणत नीलेश व सागर यांनी त्यांचा मुलगा शुभमला काठीने डोक्यावर व कमरेवर मारहाण करून जखमी केले. तसेच पत्नी आणि आईला ही काठीने मारहाण केली. याबाबत मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हे.कॉ. संजय सूर्यवंशी करत आहेत.
















