TheClearNews.Com
Wednesday, June 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ग्रामपंचायत कार्यालय म्हणजे विकासाचे केंद्र : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

जिल्ह्यात २२ ग्रामपंचायत व ५ ग्रामसचिवलयांचे काम प्रगतीपथावर

The Clear News Desk by The Clear News Desk
January 12, 2022
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) ग्रामपंचायत हा ग्रामीण प्रशासकीय यंत्रणेचा सर्वात महत्वाचा घटक असून ते विकासाचे केंद्रच आहे. ग्रामीण भागातील शेत रस्त्यांचे डांबरीकरण करणे यासाठी कटिबद्ध आहे. जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या वास्तू मोडकळीस आल्या असल्याची दखल घेऊन जिल्हा नियोजन समिती अर्थात डीपीडीसीच्या माध्यमातून २३ ग्रामपंचायतीत सुमारे ५ कोटी रूपयांच्या ग्रामपंचायतीची कामे पूर्णत्वाकडे आली आहेत. तर यंदा देखील अजून कामे मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. तालुक्यातील अंजनविहिरे येथील ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषदेच्या शाळेची सुरक्षा भिंत आणि व्यायाम शाळेतील अद्ययावत साहित्याचे लोकार्पण प्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या वास्तू मोडकळीस आल्या आहेत. या अनुषंगाने डी.पी.डी.सी. मधून पहिल्यांदाच ५ ग्राम सचिवालयांसाठी प्रत्येकी २५ लक्ष तर फर्निचरसह २२ ग्रामपंचायत कार्यालयाच्या बांधकामासाठी प्रत्येकी २० लाख अशा एकूण ४ कोटी ८५ लाख रूपयांच्या निधीला मंजूरी देण्यात आली असून यातील काही ठिकाणचे काम पूर्ण झाले असून इतर ठिकाणी प्रगतीपथावर आहे. तर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून यंदा देखील ग्रामपंचायत कार्यालयांसाठी भरीव कामे करण्यात येणार असल्याची ग्वाही देखील ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. समग्र विकासासाठी आपण ग्रामपंचायतीला सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही देखील पालकमंत्र्यांनी दिली.

READ ALSO

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषदेच्या शाळाचे वॉल कंपाऊंड आणि व्यायामशाळेतील आधुनीक सामग्री अशा सुमारे ५० लाख रूपयांच्या कामांचे लोकार्पण ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कोविडच्या नियमांचे पालन करून पार पडलेल्या या छोटेखानी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ना. गुलाबराव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सभापती प्रेमराज पाटील, जि.प. सदस्य गोपाळ चौधरी, सरपंच डॉ. विलास चव्हाण, उपसरपंच उमेश पाटील, उपसभापती पती प्रेमराज बापू पाटील, तालुका प्रमुख गजानन पाटील,डी. ओ. पाटील, ग्रामसेवक संघटनेचे पंजाबराव पाटील, ग्रामसेवक अनिल पाटील, ग्रामपंचायत सदस्य भगिरथ डोळे, युवराज सोनवणे, सचिन पवार, सुधाकर पाटील, विभाग प्रमुख रविंद्र पाटील, पवन पाटील, चंदू भाटिया, बाळू पाटील, परिसरातील सरपंच नितीन पाटील, रविंद्र पाटील, अशोक पाटील, भैय्या पाटील, तुकाराम पाटील यांच्यासह शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

मेडिकल ऑफिसर गिरीश चव्हाण, सरपंच डॉ. विलास चव्हाण, आरोग्य अधिकारी जगताप, आरोग्य सेवक कैलास पाटील, आरोग्य सेविका संगीता पवार, आशा स्वयंसेविका पूजा विसावे, रेखा दोडे, वंदना दोडे , मीना दोडे, ग्रामसेवक अनिल पाटील यांचा कोरोना काळात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेशही वाटप करण्यात आले.

सर्वसामान्यांचे आधारवड म्हणजे गुलाबभाऊ

यावेळी मान्यवरांनी सांगितले की, पालकमंत्री गुलाबराव पाटील हे कार्यकर्ते व जनतेवर प्रेम करणारे असून विकासकांची जाण असणारे व विकास सम्राट आहे. “गुलाबभाऊ” म्हणजे सर्वसामान्यांचे आधारवड असल्याचे गौरवोद्गार मनोगतातून चांदसर सरपंच सचिन पवार, आत्मा कमिटीचे अध्यक्ष सुधाकर पाटील, जि. प. सदस्य गोपाल चौधरी व तालुका प्रमुख गजानन पाटील यांनी काढले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविंद्र चव्हाण सर यांनी केले. सूत्रसंचालन ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी तर आभार ग्रामसेवक अनिल पाटील यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

June 11, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
गुन्हे

धरणगाव तालुक्यात बालिकेचा विनयभंग; संशयिताला अटक

June 3, 2026
धरणगाव

धरणगावात मोफत मोतीबिंदू शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

May 29, 2026
जिल्हा प्रशासन

पाळधी रेल्वे स्टेशनवर प्रवासी गाड्यांना थांबा देण्याची मागणी; प्रतापराव पाटील यांचे रेल्वे प्रशासनाला निवेदन

May 27, 2026
Next Post

राज्य सरकार बनली गरिबांची शत्रू ; रेशनच्या गहू, तांदळाची अनुक्रमे २० व ४० टक्के कपात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

माथेफिरूने शेतातील कापसाची झाडं उपटुन फेकलीत ; शेतकरी दाम्पत्याला अश्रू अनावर !

August 5, 2021

ब्रेकिंग न्यूज : बीएचआर घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचे पथक तीन दिवसापासून जळगावात !

January 9, 2021

मुंबई सेंट्रलचं नाव बदलणार, आता ‘नाना शंकरशेठ सेंट्रल टर्मिनस’

January 6, 2021

हिंदू व्‍यक्‍तीचा मुस्‍लीमांनी केला अंत्‍यसंस्‍कार !

September 24, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group