
जळगाव (प्रतिनिधी) – विविध संघटना , विविध विचार समजून घेत , प्रत्यक्ष सहभाग पण घेतला , बाबा , बुवा यांच्यापण नादी लागलो. पण शांतता नव्हती , अस्वस्थता होती, एकदा युरोपमध्ये गेलो तिथे मला गांधीचे महत्व अधिक पटलं, आपल्या देशात बापूंबद्दल संमिश्र प्रतिक्रिया आहेत. पण विदेशात मात्र बापू हे महात्मा आहेत. तेव्हा तिथे मला देशपांडे काका भेटले , मी त्यांना गांधी बद्दल प्रश्न विचारले ? तेव्हा त्यांनी सांगितलं की ‘अरे इतरांच जाऊ दे , तुला काय वाटत ते सांग , लिहून काढ ….’ या मधून मी “पट्यारा” लिहिलं, असे प्रसिद्ध लेखक
संतोष नागो शिंदे हे परिवर्तन आयोजित लेखकाचे अभिवाचन या कार्यक्रमात बोलत होते.
परिवर्तन जळगावच्या वतीने लेखकाचे अभिवाचन हा उपक्रम नियमित आयोजित केला जातो. ह्या उपक्रमात लेखक आपल्या लेखन कृतीचे वाचन करतात. ह्या उपक्रमात मूळचे धुळ्याचे असलेले संतोष शिंदे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून त्यांनी खूप संघर्ष करून आपलं जीवन घडवलं आहे. मोलमजुरी करून जगणाऱ्या कुटुंबातून आज ते कॉर्पोरेटच्या जगामध्ये अधिकारी आहेत.
त्यांचे पट्यारा हे पुस्तक महाराष्ट्रभर गाजते आहे. विशेषत: तरुणांमध्ये हे पुस्तक खूप लोकप्रिय आहे.
फुले , शाहू, आंबेडकर ही परंपरा आणि महात्मा गांधी हे त्यांचे आदर्श आहेत. तर छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रेरणास्थान मानतात.
याप्रसंगी अनिल कांकरिया, विनोद पाटील, मंजुषा भिडे, शंभू पाटील, अंजली पाटील, प्रा. डॉ. किशोर पवार, प्रा. डॉ. मनोज पाटील, प्रतीक्षा कल्पराज, हर्षदा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते .
















