नवी दिल्ली (वृत्तसंस्था) व्हॉट्सअॅप ५५ मिनिटं बंद राहिलं तरी लोक अस्वस्थ झाले. मात्र, बंगालमध्ये तर ५५ वर्षांपासून विकास शटडाउन आहे. मग तुम्हीच सांगा बंगालची जनता अस्वस्थ होणार नाही का. असं म्हणतंच मोदींनी लोकांना आवाहन केलं की, राज्यात भाजपाला भरपूर मतदान होईल, असं संकल्प करुनच आपल्याला इथून जायचं आहे. असं पश्चिम बंगालमध्ये प्रचारसभेसाठी पोहोचलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी वेगळ्याच अंदाजात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला आता चांगलाच वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक नेते, मंत्री पश्चिम बंगालच्या विविध भागांत प्रचारसभांमध्ये सहभागी होताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खडगपूर येथे झालेल्या व्हॉट्सअॅप डाऊन झाल्याचा उल्लेख करत ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे. मोदी म्हणाले की, काल रात्री ५० ते ५५ मिनिटांसाठी व्हॉट्सअॅप डाउन झालं, यामुळे सगळे अस्वस्थ झाले होते. बंगालमध्ये तर मागील ५५ वर्षांपासून विकास, विश्वास आणि स्वप्न गायब झाले आहेत. या सगळ्या गोष्टींनी बंगालचे लोक अस्वस्थ होणार नाहीत का?.
ममता बॅनर्जी यांनी लोकशाहीला चिरडून टाकल्याचा आरोप करीत पीएम मोदी म्हणाले, “मी बंगालच्या लोकांना आश्वासन देतो, आता दीदीला लोकशाही चिरडण्यास परवानगी दिली जाणार नाही. घटना आणि लोकशाहीच्या मर्यादा यापेक्षा मोठी कोणतीही गोष्ट नाही, हे पोलीस आणि प्रशासनाने लक्षात ठेवलं पाहिजे. बाबा साहेबांनी तयार बनवलेल्या संविधानानुसार, प्रत्येत भारतीयाला मतदानाचं स्वतंत्र आहे. मात्र बंगालमध्ये दीदी मतदान करण्याची ताकदचं हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही मोदींनी यावेळी केला.
.