जळगाव ( प्रतिनिधी ) – राज्याच्या राजकारणात अडीच वर्षांनंतर शिवसेना शिंदे गटाकडून मंत्रीमंडळात बदल केले जातील असे सुतोवाच शिवसेना आमदार किशोर पाटील यांनी नुकतेच केले. त्यानंतर अवघ्या दुसऱ्या दिवशीच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत वर्चस्व मिळविण्यासाठी शिवसेना नेत्यांना विविध जिल्हयाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. त्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे जळगाव व नंदुरबार जिल्हयाची धुरा सोपविण्यात आली आहे. अर्थातच सर्वसामान्य माणसांशी नाळ जुळलेल्या तसेच कामाचा माणूस म्हणून ओळख असलेले शिवसेनेच्या शिंदे गटातील ज्येष्ठ नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील या ‘फायरब्रेण्ड’ नेत्याचे पक्षश्रेष्ठींनी एकप्रकारे राजकीय वजन वाढविले पण त्याच बरोबर त्यांचे मंत्रीमंडळातील स्थान देखील भक्कम केले आहे.
पाचोऱ्याचे आ. किशोर पाटील यांनी अलीकडेच मंत्रिपदाची इच्छा व्यक्त केल्याने आणि त्यांना मंत्रिपद मिळावे म्हणून त्यांच्या समर्थकांनी केलेल्या मागणीमुळे ना. गुलाबराव पाटलांच्या पदावर गदा येणार का, अशी चर्चा रंगली होती. परंतु, गुलाबराव पाटलांनी यावर प्रतिक्रिया देताना चेंडू पक्षश्रेष्ठींकडे टोलवला असला, तरी त्यांचे दिल्ली आणि मुंबईतील वजन पाहता ते मंत्रिमंडळात कायम राहतील, असेच चित्र दिसत आहे.
जळगावमधील वर्चस्व आणि ‘फायरबॅण्ड’ प्रतिमा
मंत्री गुलाबराव पाटील हे केवळ जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रीच नाहीत, तर उत्तर महाराष्ट्रातील शिवसेनेचा (शिंदे गट) एक आक्रमक आणि प्रभावी चेहरा आहेत. त्यांच्या गावरान शैलीतील भाषणांमुळे आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी असलेल्या थेट संपर्कामुळे ते पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. उत्तर महाराष्ट्रात त्यांचे निर्विवाद वर्चस्व असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशा आक्रमक नेत्याला डच्चू देणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी
राजकीयदृष्ट्या जोखमीचे ठरू शकते. पक्षश्रेष्ठींचा विश्वास आणि कामगिरीचे ऑडिट नुकत्याच झालेल्या चर्चेनुसार, मंत्र्यांच्या कामगिरीचे ‘ऑडिट’ होणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, गुलाबराव पाटील यांनी राबवलेल्या पाणीपुरवठा योजना आणि जलजीवन मिशनमधील कामांमुळे त्यांना सकारात्मक गुण मिळण्याची शक्यता आहे. त्यातच शिंदे गटात प्रभावी नेत्यांपैकी ‘टॉप’चे नेते म्हणून त्यांची गणना केली जाते. शिंदे गटातील आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक असले तरी, गुलाबराव पाटलांचे स्थान अद्याप अबाधित असल्याचे संकेत मिळत आहेत. विषेश म्हणजे राज्यात सर्वाधिक डिपीडीसीचा निधी खर्च करण्यात गुलाबराव अव्वल आहे. जिल्हयातील आमदारांना निधी देण्यास देखील आकडेवारी पाहता दुजाभाव करतांना दिसत नाही त्यामुळे विरोधाला विरोध म्हणून काही जण कोपऱ्यात बोलतात पण प्रत्यक्षात त्यांना दिलेल्या निधीचे आकडे पाहता खरोखर ‘कामाचा माणूस’ असल्याचे स्पष्ट होते.
जिल्ह्यात युतीमध्ये समन्वय राज्यभरात अनेक ठिकाणी भाजप, शिंदे गट व अजित पवार गटात कुरबुरी आहे. मात्र जळगाव जिल्हयात भाजपा व शिंदे गटातील ‘गोडवा’ कायम ठेवण्यात गुलाबराव पाटलांना समन्वयाच्या भूमिकेतून यश आले आहे. तीन्ही पक्षातील नेत्यांशी त्यांचे असलेले ट्युनिंग आणि विकास कामांचा धडाका या त्यांच्या जमेच्या बाजू आहे.
जिल्ह्यातील निवडणुकांमध्ये यश
जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापुर्वी झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीत त्यांची कामगीरी प्रभावी राहीली आहे. त्यांच्या ‘होमपीच’ धरणगावात त्यांना अपयश आले असले तरी पहिल्यांदाच येथे भाजपा सेनेत युती जुडवून आणली हे विषेश. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात प्रत्येक निवडणुकीत भाजपाने विरोधाची भुमिका घेतली आहे. युती तर कधी झाली नाही पण या नगरपालिका निवडणुकीत भाजप सोबत युती करीत धरणगाव् नगरपालिका एकत्र लढले हे विशेष. तत्पर्वी विधानसभा निवडणुकांमध्ये शिंदे गटाचे ५ आमदार निवडून आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहीला आहे. स्वताचा मतदार संघ सोडून मंत्री गुलाबराव पाटील यांच्य चोपडा, पारोळा, मुक्ताईनगर, पाचोर भडगाव या मतदार संघात सभा घेऊन वातावरण चांगलेच तापवले आणि य मतदारसंघावर भगवा फडकाविल आणि पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांचे राज्याच्या राजकारणात हात बळकट केले.

















